नायगावकरांचे ठरल : प्रा.रवींद्र चव्हाण यांना संसदेत पाठवण्याचा निर्धार

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : नायगाव येथे शहरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सोमवारी सकाळी संवाद बैठक आयोजित केली होती. यावेळी नागरिकांनी आपला भरभक्कम पाठींबा व्यक्त करतांना विजयासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करुत पण तुम्हाला संसदेत पाठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार केला. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी माझ्या पाठीवर मायेचा हात ठेवून नेतृत्व करण्याची संधी द्या असे भावनिक आवाहन केले.

खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी काँग्रेसने प्रा. रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर चव्हाण कूटूंबीय प्रचाराला लागले आहे. जिल्हाभर प्रचारात व्यस्त असताना आपला गाव मागे राहू नये यासाठी नायगावकरांशी हितगूज करण्यासाठी दि.२१ रोजी सोमवारी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित नागरिकांनी दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांच्या जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच पण निवडून आणण्यासाठी कुठरीच कसर ठेवणार नसल्याचे सांगतांनाच अनेकांनी भरभक्कम पाठिंबा व्यक्त केला.
प्रा.रवींद्र चव्हाण हे वडीलांच्या निधनानंतर थेट लोकसभेच्या निवडणूकीला सामोरे जात असल्याने ते काय बोलणार याची उत्सुकता नागरिकांना होती त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी उपस्थितांना संबधीत करतांना प्रा. रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार बळवंतराव चव्हाण, दिवंगत खा. वसंतराव चव्हाण व चव्हाण परिवाराची मतदारांशी असलेली बांधिलकी आपल्या भाषणातून व्यक्त केली. मतदारांनी आजपर्यंत चव्हाण परिवाराला भरभरून मदत केलेली आहे याचा विसर आम्हाला कधीच पडणार नाही असे सांगितले.
खा.वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली यामुळे मी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार असून माझे आजोबा कै.बळवंतराव चव्हाण व माझे वडील स्वर्गीय खा. वसंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच अनेक वर्षापासून चव्हाण परिवाराची जनसेवा चालू अविरतपणे पुढे चालविण्यासाठी पाठीवर मायेचा हात ठेवून या पोटनिवडणुकीत मला आपण संधी द्यावी आपल्या सेवेला मी कदापी कमी पडणार नाही असे भावनिक आवाहन प्रा.रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या संवाद बैठकीला ग्रामदेवतेचचे दर्शन, लोकनेते कै.बळवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळाचे दर्शन व स्व.वसंतराव चव्हाण साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करून सुरुवात झाली. व्यासपीठावर हणमंतराव चव्हाण, मेडेवार, सुरेश कल्याण, केशवराव चव्हाण, रवींद्र चव्हाण, सय्यद रहीम, शिंदे सर, दत्ता पाटील इज्जतगावकर, दिलीप पांढरे, माधवराव शिंदे, ह.स.खंडगावकर, शिवाजी गोळेगावकर, चंद्रकांत कवटीकवार, किशनराव बोंमनाळे आदी उपस्थित होते. पवन गाडेवार, राजु कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक चव्हाण सर यांनी मांडले तर सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विजय चव्हाण यांनी आभार मांडले.