ताज्या बातम्यानांदेडनायगांव

बिज प्रकिया करुनच पेरणी करावी-डॉ.अंभोरे

मोरे मनोहर
किनाळा :- कृर्षी विभाग बिलोली आणि संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी व कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीने किनाळा ता.बिलोली येथे दि.28 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या खरिप पेरणी पुर्व मार्गदर्शन कार्यशाळेत बोलतांना डॉ अंभोरे यांनी शेतात पेरणी करण्यापूर्वी सर्व बियाण्याची बिज प्रकिया करुनच शेतकऱ्यांनी पेरणी करावे असे आवाहन केले.

खरीप पिकाची पेरणी करण्यासाठी शेतकरी शेतीची मशागत करून पावसाच्या प्रतीक्षेत असताना ग्रामीण भागातील शेतकरी आजही मोठ्या प्रमाणात बीज प्रक्रिया न करताच शेतीची पेरणी करतअसतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पीक कधी उगवत नाही तर कधी उगवण क्षमता कमी असते तर कधी अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील अनेक पिकांची उगवणच होत नाही यामुळे शेतकऱ्यावर अनेक वेळा दुबार पेरणीचे संकट येते यातून शेतकरी कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते यासाठी शेतकऱ्यांना मदत व योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे यासाठी पेरणीपूर्व शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा किराळा तालुका बिलोली येथे आयोजित करून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ता.कृषी मंडळ अधिकारी महेश सर, कृषी सहाय्यक अजय साळवे, मारोती वडडे यांनी शेतकऱ्यांच्या विवीध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसरपंच बालाजी भोसले, पो पा.राजु भोसले चेअरमन, माधव पाटील भोसले, पंडित पाटील, व्यंकटराव शेळगांवे, पंडित वाघमारे, प्रताप मोहिते, राजु मोहिते यासह गावातील प्रगत शिल शेतकरी मंगेश भोसले, शंकर खराटे यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी विवीध शासकिय योजनांची माहिती बिलोली मंडळ कृषी अधिकारीण महेश सर यांनी दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर्षी सहायक अजय साळवे, संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी चे प्रतिनिधी मारोती वडडे यांनी विशेष परिश्रम घेतले शेवटी आभार प्रदर्शन येथील उपसरपंच बालाजी पाटील भोसले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker