ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

आ.राजेश पवाराकडून भ्रमनिरास… कवळे गुरुजींना महायुतीची उमेदवारी देण्याची मागणी

प्रल्हाद हिवराळे

उमरी : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळालेल्या कमी मतामुळे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्याबद्दल भ्रमनिरास झाला असल्याने मतदारात प्रचंड नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील एक उद्योजक आणि हजारो तरुणांच्या हाताला काम देवून सन्मानाने जगण्यासाठी प्रेरित करणारे आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अर्थिक प्रगतीत हातभार लावणारे मारोतराव कवळे गुरुजी यांना महायुतीकडून नायगाव विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी व्यंकटराव पाटील जामगावकर यांनी केली आहे.

शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, व्यापारी आधीच्या हाताला काम लावणारे सामाजिक बांधिलकी जोपासत एकमेव नायगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी नेते मारोतराव व्यंकटराव पाटील कवळे गुरूजी यांनी गुरूजी उद्योग समूह व कवळे पतसंस्थेकडुन अनेकांना मदतीचा हात दिल्याने आज घडीला प्रत्येक व्यक्ती, कुटूंब सन्मानाने जीवन जगत आहे. कै.माजी आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर व कै.बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणाला समाजकारणाची जोड देत लोकाभिमुख कामे नायगाव विधानसभा मतदार संघात करण्यात येत आहेत.

मतदार संघात कवळे पतसंस्थेच्या माध्यमातुन शेतक-यासह सुशिक्षित बेरोजगार तरुण युवकास अनेक उद्योग व्यवसायसाठी मदत केले, सिंधी येथे गुळपावडर कारखाना तर वाघलवाडा येथे दोन कारखाने उभारल्याने नायगाव मतदार संघातील हजारो बेरोजगार तरुण युवकास हाताला रोजगार दिलेच. शेतक-यांना ऊस पिकांच्या माध्यमातून करडो रूपये त्यांना मिळुन दिले. प्रगतीकडे घेऊन जाणारे विकासासाची दृष्टी असणारे शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरूजी यांनाच पक्षाने उमेदवारी दिल्यास सहजरित्या निवडून येतील.

कवळे गुरूजी चे काम पाहुन राजकीय क्षैञातील विरोधक जरी असले तरी यांच्या कडे कुतूहलाने विचारच करतो. शुन्यातुन विश्व निर्माण करून मतदार संघात उद्योग क्षैञाचे जाळे पसरविले. राजकीय जीवनात प्रत्येकाला चढ उतार असतोच मधल्या काळात भागात वाघलवाडा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विचार करून माजी मुख्यमंञी अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून हा वाघलवाडा साखर कारखाना घेतला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम सुरु केले.

एकीकडे कवळे गुरुवारी पतसंस्था, गुळ कारखाना, साखर कारखान्यासह विविध उद्योगाच्या माध्यमातून मतदारसंघात उद्योग उभा केले आहेत पण दुसरीकडे ५५ हजार माताधिक्याने निवडणूक आलेले हाय प्रोफाइल आमदार राजेश पवार उद्योग तर सोडा तरुणांच्या हाताला काम मिळेल असा एकही प्रकल्प आणला नाही. त्यांना वाटले तर मतदारसंघात येताना आणि जातात. ना मतदारांशी संपर्क ठेवतात ना तरुणांच्या फोनला प्रतिसाद देतात. विशेष म्हणजे या निष्क्रिय आमदारामुळे भाजपचे लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना फटका बसला. ५५ हजार मताधिक्याने स्वतः निवडून आल्यानंतर चिखलीकरांना ५ हजाराचेही मताधिक्य देण्यात अपयशी ठरले.

कवळे गुरुजी आणि आ. राजेश पवार यांची तुलना केल्यास कवळे गुरुजींचे काम अतिशय सरस व चांगले असल्याचा मतप्रवाह मतदारसंघात दिसून येत आहे. आ. पवार यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास पराभवालाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीला आपली पत राखायची असल्यास कवळे गुरुजींनाच उमेदवारी द्यावी लागेल अशी आग्रह मागणी व्यंकटराव पाटील जामगावकर यांनी न्यु भारत टाईम्सच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker