धनगर समाजाला अनुसूचित जामाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी अमरण उपोषणाला बसलेले अशोकराव नाईक यांची उपोषणतूर्तास माघे

जयवर्धन भोसीकर
नांदेड :- मुखेड येथील धनगर समाजाचे कार्यकर्ते अशोकराव नाईक यांनी उपोषणास सुरुवात केली. आज उपोषणाचा त्यांचा नववा दिवस होता. मागील अनेक वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी होत आहे.
अनेकदा या मागणीसाठी धनगर समाजाने अनेक आंदोलने केले असून याच मागणीसाठी मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते अशोकराव प्रल्हादराव नाईक यांनी मुखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक 12 ऑगस्ट 2024 पासून आमरण उपोषणास सुरुवात केली होती. आज मुख्यमंत्र्यां चे खाजगी सचिव बालाजीराव खतगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले उपोषण तूर्तास मागे घेतले आहे.
गेल्या आठ दिवसापासून अशोकराव नाईक हे या मागणीसाठी उपोषण करीत असून आज अशोकराव नाईक यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविण्यासाठी मुखेड बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला व्यापक प्रमाणात धनगर समाजाचा पाठिंबा मिळत होता. उपोषण स्थळी अनेक राजकीय पक्षातील नेत्यांबरोबरच समाजातील अनेक नेते कार्यकर्ते भेट दिली होती.
अशोकराव प्रल्हादराव नाईक हे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागील आठ दिवसा आज उपोषणाचा त्यांचा नवा दिवस आहे. मागील नऊ दिवसापासून आमरण उपोषण करीत असले तरी शासनाच्या वतीने या आंदोलनाकडे कोणीही लक्ष दिले नाही असा आरोप उपोषणकर्ते अशोकराव नाईक यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय हा जैसे थे असून कुठलेही सरकार धनगर समाजाच्या या मागणीकडे लक्ष देत नाही स्वतंत्र पूर्व काळापासून मेंढ्या शेळ्या राखून आपली उपजीविका करीत भटकंती करणारा हा समाज आहे या समाजाची आजची सामाजिक व शैक्षणिक परिस्थिती अतिशय बिकट असून या समाजाच्या प्रगतीसाठी धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यास त्याचा फायदा समाजाला होईल.
अगदी सुरुवातीपासून हा रानावनात आदिवासी जमाती प्रमाणे वास्तव्यास असणारा समाज आहे. मात्र या समाजाच्या हितासाठी शासन स्तरावर प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे उत्तरोत्तर या समाजाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. आता तरी या समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण देऊन या समाजाची उन्नती करावी असे प्रतिपादन उपोषणकर्ते अशोकराव नाईक यांनी केले आहे.
हा आरक्षणाचा प्रश्न देश पातळीवरील असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत चर्चा करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव बालाजीराव खतगावकर यांनी उपोषण कर्त्यास दिले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा हा दीर्घकाळापासून सुरू असल्या असलेला लढा असून यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कानावर हे टाकून धनगर आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडविल्या जाईल असे प्रतिपादन ही खतगावकर यांनी केले.
यावेळी लवकरच आंदोलन करते अशोकराव प्रल्हादराव नाईक आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांशी बैठक होईल असेही खतगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे. सामाजिक कार्यकर्ते नारायण गायकवाड, काँग्रेसचे श्रावण रेपनवाड, आदिवासी समाजाचे नेते शिवाजी गेडेवाड, धनगर समाजाचे नेते डॉक्टर राम श्रीरामे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.