उमरीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून महापुरुषांच्या पुतळ्याचे राञीला अनधिकृत आनावरण
मतदार संघात उलटसुलट चर्चेला उधाण.. आचारसंहितेचे भंग आधिका-यांचे कोंडी.

प्रल्हाद हिवराळे
उमरी :- उमरी मौढा मैदान येथे छञपती शिवाजी महाराज यांच्या अशोरूढ पुतळ्याचे बांधकाम करून अनावरणासाठी सज्ज असताना. आचारसंहिता लागल्याने कार्यक्रम स्थगित झाले.
आचारसंहिता लागण्या अगोदर पुतळा उभारणारीचे काम पुर्ण होऊन पंधरा दिवस झाले या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी विधानसभेचे लोकप्रतिनिधीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती परंतु विधानसभा निवडणूक ऐण तोंडावर आल्याने अखेर वरिल नेत्यांची तारिख मिळाली नसल्याने अनावरण राहिले.

त्यात १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी अचानक आचारसंहिता लागले. यात पुतळ्याचे पुर्ण काम झाल्याने पुतळ्याला लाल कपड्याने झाकून ठेवण्यात आले होते. महापुरुषाचे आनावरण आपल्या कारकीर्दीत झाले नसल्याने या भाजपच्या बड्या विद्यमान नेत्यांनी आपल्या कार्यक्रत्यांना ता. १८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी आदेश देऊन तात्काळ किरण चे गाडी आणुन पुतळयावर चढून पुतळ्याला बांधुन ठेवलेला लाल कपडा काढून प्रतिमेला हार टाकून अतिष बाजी करुन अनावरण करण्यात आले.

सध्या मतदार संघातील नेत्यांनी उमेदवारी मिळुन घेण्यासाठी मुबंई व दिल्ली दरबारी रेलचेल चालु असल्याने सदर अतिषबाजी हे उमरी मौढा मैदानावर केल्याने कोणाला उमेदवारी मिळाले हे पहाण्यासाठी एकच गर्दी झाले तेव्हा पहाता कोणीतरी पुतळ्यावर जाऊन बांधलेला कपडा काढून फटाके वाजवून छञपती शिवाजी महाराज यांना हार टाकण्यात आले. तात्काळ सकल मराठा समाजाचे अनेक कार्यक्रत्य जमा होऊन सदर घटनेची माहिती उमरी पोलीसांना देण्यात आले. आचारसंहितेचे भंग झाले असे लेखी तक्रार सकल मराठा समाजांच्या वतीने पोलिसात देण्यात आले. तसे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सह एपीआय अंकुश माने यांनी घटनास्थळी येऊन जमावाला समज दिले.
तेव्हा सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देताना छावाचे जिल्हाध्यक्ष माधव पाटील ताटे, तालुकाध्यक्ष राजेश जाधव, साहेबराव शिंदे बोळसेकर, क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील इज्जतगावकर, माजी नगरसेवक बाळु पाटील शिंदे, श्री. दुगाडे, नागेश पाटील पांढरे यांनी दिले. सदर घटनेची दखल बाबद आचारसंहितेचा भंग झाले असे निवडणूक विभागाला माहिती पोलीसांनी दिल्याने निवडणूक निर्णय आधिकारी यांनी याबाबतीत काय निर्णय घेतील याकडे उमरीवासीयाचे लक्ष लागले आहे.