भास्कररावजी पाटील खतगावकर यांचे शंकरनगर परीसरात ठिक ठिकाणी स्वागत

मोरे मनोहर
किनाळा:- राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांचे मेहुणे राज्याचे माजी मंत्री तथा माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब आणि डॉ.मीनल ताई निरंजन पाटील खतगावकर हे भाजपाला अखेरचा रामराम ठोकत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व माजी मंत्री आमदार अमित भैया देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर ते हैदराबाद येथून नांदेड कडे जात असताना त्यांचे दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी शंकरनगर परिसरात ठीक ठिकाणी फटाके फोडून ढोल ताशाच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.

भास्कररावजी पाटील खतगावकर यांनी सामान्य जनतेच्या विकासासाठी राजाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात गेले असता ते मंत्रिमंडळात जातील आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होईल हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत भाजपात जाण्याचा निर्णय घेतलेला होता. भास्करराव पाटील भाजपात गेल्यानंतर भाजप पक्षाचे प्रामाणिक काम करूनही डॉ.सौ.मिनल पाटील खतगावकर यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी देण्याचे टाळले,नंतर विधानपरिषदेवर घेन्याचा शब्द देऊनही पाळले नाही.
एवढे करूनही पदोपदी अपमान केला जात असल्याने अखेर दादांनी भाजपाला धक्का देत पुन्हा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केल्याने नांदेड मधील विस्कळीत झालेला काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट होईल आणि येणाऱ्या नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला दादांचा नक्कीच मोठा फायदा होईल असे वातावरण निर्माण झाले.
दादांनी केलेल्या पक्षप्रवेशा नंतर आज हैदराबाद येथुन ते नांदेड कडे येत असताना त्यांचे अटकळि, टाकळी, केरुर, आदमपुर, बिजुर, भोपाळा, शंकरनगर, किनाळा, हिपरगा माळ, नरसी येथे फटाके फोडुन ढोल ताशाच्या गजरात ठिकठिकाणी जल्लोष करुन दादांचे भव्य स्वागत करण्यात आले.