धनंज खुर्द येथे मराठा आरक्षण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या

बालासाहेब शिंदे
मारतळा :- लोहा तालुक्यातील धनंज खुर्द येथील एका शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांने दि.६ मार्च रोजी दुपारी आपल्याच शेतात असलेल्या कडूलिंबाच्या झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली ही घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.
रुपेश बळवंत ताटे (वय १७ वर्षे ) हा परभणी येथे कॉलेजात ११ वी मध्ये शिकत होता त्याने कॉलेजची फि भरण्यासाठी घरी वडिलांना पैसे मागितले होते घरची परिस्थिती अत्यंत हलाकिची व वडील कर्जबाजारी आसल्यामुळे वडिलांनी फी भरण्यासाठी नकार दिला माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगितले किती जरी शिकलास तरी आपल्या मराठा समाजाला काही आरक्षण नाही.
तू शिकून पण तुझा काही फायदा होणार नाहीं त्यामुळे तू शाळा सोडून कुठे तरी रोजमजुरी कर असं सांगितल्याने आपल्याला आरक्षण व घरची परिस्थिती ही बेताची असल्यामुळे वडील कर्जही फेडू शकत नाहीत आपल्याला आता शिकता येणार म्हणून त्याने फाशी घेऊन स्वतःच जीवन यात्रा संपविली ही माहिती उस्मान नगर दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी कापसी (बू) येथील दवाखान्यात पाठवले दरम्यान मयत रुपेश याच्या पाठीमागे आई,वडील एक भाऊ असा परिवार आहे.