ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव पंचायत समितीची बायोमेट्रिक यंत्रणा नावालाच

अधिकारी आणि कर्मचारी येतात त्यांच्या सोईनुसार

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : सर्व कार्यालये शंभर टक्के क्षमतेने सुरु झाले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवरच नोंदविण्यात यावी. असे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे नायगाव पंचायत समितीने यंत्रणा बसविली आहे मात्र एकही अधिकारी आणि कर्मचारी बायोमेट्रिक हजेरी लावत नाही. ते त्यांच्या सोईनुसार ११ वाजल्यानंतर व दुपारी कधीतरी कार्यालयात येतात. त्यामुळे बसवण्यात आलेली बायोमेट्रिक यंत्रणा ही कुचकामी ठरली आहे.

कोरोना काळात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर स्थगित करण्यात आला होता. या कालावधीमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थिती हजेरी पटावर नोंदविण्याबाबत प्रशासकीय विभाग व क्षेत्रीय कार्यालयातील आस्थापना शाखांनी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या संधीचा फायदा घेवून अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोईनुसार येत होते.

त्यामुळे (ता. २९) फेब्रुवारी २०२० शासकीय कार्यालयांसाठी पाच  दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला. शनिवार व रविवार हे सुट्टी देण्यात आली. पाच दिवसाचा आठवडा करतांना शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली असून ती सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी करण्यात आली आहे. तरीही एकही अधिकारी आणि कर्मचारी आज परिस्थितीत ११ वाजल्याच्या नंतर दुपारी त्यांच्या सोईनुसार येत आहेत.

अधिकारी आणि कर्मचारी हे ठरवून दिलेल्या वेळेत येत आणि जात नसल्याने शासनाने ( ता. २३) मे रोजी एक परिपत्रक काढून सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आता बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवरच नोंदविण्यात यावी. सर्व शासकीय कार्यालयाच्या आस्थापना शाखांनी सर्व अधिकारी व कर्मचारी कार्यालयात येताना व कार्यालय सोडताना त्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच नोंदवित आहेत याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.

बायोमेट्रिक प्रणाली सुरु करण्याबाबत शासनाने स्पष्ट निंर्देश दिले त्यामुळे नायगाव पंचायत समितीने बायोमेट्रिक हजेरीची यंत्रणा बसवली पण एकही अधिकारी आणि कर्मचारी सकाळी ९.४५ या शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत हजर राहत नाहीत. उशिरा आल्यानंतर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवत नाहीत त्यामुळे नायगाव पंचायत समितीमध्ये बसवण्यात आलेली बायोमेट्रिक यंत्रणा ही कुचकामी ठरली असून. अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या सोईनुसार आणि वाटेल तेव्हा येतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker