रवींद्र चव्हाण दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील – माजी मंत्री भास्करराव पा. खतगावकर

प्रल्हाद हिवराळे
उमरी : विधानसभा व लोकसभेची पोटनिवडणूक एकाच वेळी होणार असल्याने प्रा. रवींद्र चव्हाण हे दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार असून त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू. असे सांगतानांच डॉ. मिनल खतगावकरला मेरिटवर व तिच्या कर्तृत्वावर विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

काँग्रेसच्या मिञ पक्षाने विधानसभेची उमेदवारी मागितली असली तरीही अजून जाहीर होयाचे बाकी आहे. हारियाणात भाजप ने जिंकले नाहीत ते व्हीएम मशीन ने गडबड करुन निवडणूक जिंकले. आमचा काॅग्रेस पक्ष न्यायालयात गेला. त्यांना समर्थ देण्यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार आहेत. ते देशाचे जाणते नेते आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी बहुमताने येणारच यात प्रा.रविंद्र चव्हाण हे लोकसभेच्या निवडणुकीत दोन लाखाने येणार असे मी आताच जाहीर करतो. यांना निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावू असे माजी मंञी भास्करराव पाटील खतगांवकर उमरी येथील काॅग्रेस कार्यक्रत्याच्या बैठकीतून जाहीर बोलले.
आमच्या मिनल खतगावकर यांना विधानसभेचे व लोकसभेचे उमेदवारी नाही दिले तरी ही चालेल तीच्या कर्तुत्वावर उमेदवारी मिळेल तो तिचा प्रश्न आहे. आम्ही प्रा.रविंद्र चव्हाण यांना निवडूण आनू या वयात आम्ही फक्त मार्गदर्शन करायचे ठरवले आहे. भाजप महायुतीने लाडकी बहीण योजना काढले असले तरीही माझ्याकडे लाडका मेहुणा आहे.
नातेवाईक आहोत आम्हाला जावाव लागते येवाव लागते. नायगावचे चव्हाण घराणे व खतगावकर एक झाल्याने विरोधकांना धडकी भरली. जिल्हा परिषद, पंचायत समिती नगर पालिकाअसो गोदावरी पलीकडे आमचेच चालते. नायगावकर तसे हुशार आहेत कोणालाही शिव्या देत नाही. बंडू तु शांत रहा कोणाची जिरवायचे ते काम आम्ही करू असे स्पष्टपणे सांगितले. कार्यकर्त्यांनो कामाला लागा तुम्ही गाव सांभाळा.
त्यामुळे जास्ती मताने आपले उमेदवार कसे ही निवडुण येणार आहोत. देशात व महाराष्ट्रात राजकारणाचे वारे नेते शरद पवारांना समजते आणी नांदेडचे वारे मला समजते. सध्या वातावरण चांगले आहे यात जरांगे पाटील यांनी डरकाळी फोडल्याने बीजेपी पक्षाचे पातळ झाले. त्यामुळे बंडू तु टेंशन घ्यायचे काहीही कारण नाही तुझ्या प्रकृतीची काळजी घे, निवडण आपोआप येणारच आहे असे शेवटी खतगांवकर यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सुरजीत सिंग गिल, गणेशराव पाटील करखेलीकर, हनमंत पाटील चव्हाण, अंनद पाटील चव्हाण, गोविंदराव पाटील सिंधिकर, मल्लिकार्जुन चंदापूरे, प्रल्हाद पाटील इज्जतगावकर, यांच्यासह असंख्य उपस्थित होते. माझे वडील हक्काच्या तालुक्यात कमी वेळ दिले पण तुमच्याकडे जास्त वेळ दिले. कार्यक्रत्याच्या जीवावर आम्ही विधानसभेला अपक्ष पहिल्यांदा उतरून निवडणूक जिंकलो याही.
पुढे कार्यक्रत्याच्या जीवावर निवडणूक जिंकल्या विश्वास काॅग्रेस पक्षाकडून लोकसभेचे उमेदवार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी बोलतांना व्यक्त केले. सुख दुखात साथ वडील दिले १२०० गावातील कार्यक्रत्यानी एकजुटीने काम केल्याने लोकसभेला वंसतराव चव्हाण निवडूण आले. खतगांवकर सारखे राजकारणातील आता आम्हाला अनुभवी सोबत आहेत. देगलूर, बिलोली,भोकर, मुखेड, नायगाव आधी विधानसभेतील मताधिक्य मिळेल यात शंका नाही.